राज्यातील भूविकास बँका 2015 या वर्षी बंद झाल्या होत्या. त्या बँकांमध्ये ज्या शेतकऱ्यांचे खाते होते, त्या शेतकऱ्यांनी बँक बंद होण्याच्या अगोदरच पीक कर्ज घेतले होते. ते पीक कर्ज शेतकऱ्यांनी अजून परत भरले नाही. कर्जदार शेतकऱ्यांकडे थकित असलेले पिक कर्ज वसूल करणे सुद्धा शक्य नाही. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे भूविकास बँकेचे थकीत Bank Loan पीक कर्ज आहे, त्या शेतकऱ्यांना पिक कर्ज सुद्धा घेता येत नव्हते. त्यामुळे शिंदे सरकारने त्या सर्व कर्जदार शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
फक्त याच नाव त्यांना एसटीत मोफत प्रवास
👇👇👇
येथे क्लिक करा
भूविकास बँकेतील थकीत कर्जदार शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 964 कोटी इतका निधी मंजूर केलेला आहे. त्यामुळे आता लवकरच हे कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. या कर्जमाफीचा लाभ राज्यातील 34 हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे.
0 टिप्पण्या