जून ते ऑक्टोबर २०२० या वर्षी राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली होती. त्या अतिवृष्टीमुळे पावसाचे पाणी शेतात साचून शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते, त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान देण्याचे सरकारने जाहीर केले होते. नुकसान भरपाई अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी सरकारने निधी देखील मंजूर केलेला आहे. या अनुदानाचे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकार कडून जमा केले जाणार आहेत. नुकसान भरपाई अनुदान कोरडवाहू शेतीसाठी हेक्टरी १५ हजार रूपये व बागायत शेतीसाठी हेक्टरी २५ हजार रूपये याप्रमाणे दिले जाणार आहे.
0 टिप्पण्या